अनुभव 6
माझे मित्र श्रा. रमेश (दादा) ठोसर व मी एकाच शाळेत शिक्षक होतो. ते हायस्कूलला विज्ञान शिकवत असत. त्यांचे व माझे खुप मित्रत्वाचे संबंध (भावासारखे). त्यांच्या वरील हा प्रसंग. प. पू. महाराजांनी श्री. ठोसर यांच्या मुलाला बाधलेला ब्रम्ह सबंध काढला त्याची ही सत्य हकीकत. श्रा. ठोसर यांना एक 8 वर्षाचा मुलगा होता. (नांव.सुहास) त्याला एकदा बाधा झाली. दर महिन्याच्या अमावस्येला त्याची प्रकृती एकदम बिघडायची, तोंडातून फेस यायचा काही वेळेला डोळे फिरवायचा त्यांनी मुलाला मुंबईला नेवून तज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या खूप खर्च केला, पण काहीच निघाले नाही. सर्व डॉक्टरांनी हात टेकले पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही असे 1॥ वर्ष गेले. श्री. ठोसर काळजीत पडले. त्यांनी मला ही सर्वच हकीकत सांगितली. एकदा सुहासची प्रकृती बिघडली. त्या दिवशी अमावस्या होती. सुहासची प्रकृती जास्त होती मी त्यांना म्हणालो जर तुमचा विश्वास असेल तर आपण आज पुज्य कुळकर्णी महाराजांकडे जावुन त्यांना विचारु त्या दिवशी गुरुवार होता. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता पण मुलां करिता आणि माझ्यावर विश्वास ठेवुन आम्ही संध्याकाळी आरतीचे वेळी प. पु. महाराजांकडे गेलो. आरती नंतर संचार झाल्यावर त्यांना श्री. ठोसरांना प्रकृती बद्यल विचारायला लावले. प. पु. महाराजांनी प्रश्न केला ''तुमचा विश्वास आहे काय '' शंका ठेवून विचारु नका. मी सांगीतले, श्री. ठोसर अत्यंत काळजीत आहेत, आपण सांगा ते श्रध्दा ठेवतील. प. पू. महाराजांनी सांगितले, तुमच्या घराच्या मागे मोठा पिंपळ आहे त्याच्या खाली तुमचा मुलगा संध्याकाळी (लघुशंका) लघवीस बसला आणि त्याला ''ब्रम्ह संबंध बाधा ''झाली. संचार असतांना महाराजांनी हे सांगितले.
नुतर पूज्य महाराजांना आम्ही उपाय सांगावा अशी प्रार्थना केली. प. पूज्य महाराज पुन्हा म्हणाले श्रध्दा ठेवून उपचार काय कराल, काही उपाय कठीण आहे. श्री. ठोसर होय म्हणाले रोज सुर्येदयापूर्वी स्नान करुन सोवळयाने पिंपळास 108 प्रदक्षिणा घाला. अखंड 107 दिवस झाल्यावर परत मला भेटा. प. पूज्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री. ठोसरांनी केले 75 दिवसांनी प्रकृतीत सुधारणा होत गेली. 107 दिवसांनंतर आम्ही पुन्हा प. पूज्य महाराजांना भेटावयास गेलो. प. पूज्य महाराजांनी उपाय सांगितल. 5-6 माणसांना भरपूर पुरले एवढे अन्न. 40-50 पुरणाच्या पोळया , भरपूर भात, वरण, दोन भाज्या, भजे, तूप, कढी सोवळयांत स्वयंपाक करुन उद्या (तो 108 वा दिवस होता.) प्रदक्षिणा संपल्यावर सूर्यादयापूर्वी तो नैवेद्य पिंपळाच्या झडाखाली झाकून ठेवा व नंतर घरी जा. 2 तासानंतर परत येवून तो नैवेद्य उघडून पाहा. जर नैवेद्य पूर्ण खाल्ला तर बाधा गेली असे समजा. जर नैवेद्य खाल्ला नाही तर माझ कडे या मी त्याचा बंदोबस्त करीन. प. पूज्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री. ठोसरांनी (नैवेद्य खाल्ला होता) आता तो एम.बी.बी.एस. डॉक्टर असून नागपूरला प्रॅक्टीस करतो. हीं सर्व माहराजांच्या कृपेचेच फळ अशी आमची सर्वांची श्रध्दा आह.
|